स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास. 2इतिहास लेखन भारतीय परंपरा.
२. इतिहास लेखन भारतीय परंपरा
१. अ) दिलेल्या पर्याांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सर संचालक............... हे होत.
१✓. अलेक्झांडर कनिंगहॅम. २. विल्यम जोन्स
३. जॉन मार्शल. ४. फ्रेडरिक मॅक्सम्युलर
अलेक्झांडर कनिंगहॅम
२. हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचाजर्मन भाषेत अनुवाद........... यांनी केला.
१. जेम्स मिल. २✓.फ्रेडरिक मॅक्सम्युलर
३. माउंट स्टुअर्ट एल्फीन्स्टन. ४. जॉन मार्शल
फ्रेडरिक मॅक्सम्युलर
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
१. हू वेअर् द शुद्राज- वंचितांचा इतिहास
२.स्रीपुरूष तुलना - स्रीवादी लेखन
३. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स१८५७- मार्क्सवादी इतिहास
४. ग्रँड डफ- वसाहतवादी इतिहास
३. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स१८५७- राष्ट्रवादी इतिहास
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.(मार्च१९)
१. इंग्रजी शिक्षणाने भारतात निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.
२. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या
पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकानी विरोध केला.
३. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.
२ . बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे.
१.ऐतिहासीक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र- शिलालेख, कागदपत्रे, नाणे, प्रवासवर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिासिक बखरींचा समावेश होतो.
२. बखरीत शुर योध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणिआणि योध्यांची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
३. तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे.
३. पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा.
१. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे.
मुघल सम्राट बाबर यांनी आपल्या तुझुक- ई- बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींचा समावेश केला आहे.
१. मुघल सम्राट बाबर यांना कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने.
२. ज्या ज्या प्रदेशात बाबर यांनी प्रवेश केला, त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने.
३. स्थानिक अर्थव्यवस्था, रितीरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे.
२. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान कोणते?
स्वातंत्र्यवीर सावरकरकरानी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीप्रमाणे:
१.१८५७ साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' असे पुस्तक लिहिले.
२. त्यांच्या या आणी अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
३. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय?
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवीन वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा प्रमुख प्रवाह आहे.
१. मार्क्सवादात वर्गसंघर्ष यावर भर दिला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
२. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने ,पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केला आहे.
३. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे.
४. मार्क्सवादी इतिहास लेखकांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपले इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
२. इतिहासाचार्य वि. का .राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणारे वि .का .राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे:
१. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने'असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
२. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीन समग्र जीवनदर्शन होय, हा विचार राजवाडे यांनी मांडला.
३. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेले कटकारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती, म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते.
४. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
५. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
५. अ) पुढील तक्ता पूर्ण करा
१. जेम्स मिल-द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
२. जेम्स ग्रँड डफ-द हिस्टरी ऑफ द मराठा
३.माउंट स्टुअर्ट एल्फीन्स्टन-द हिस्टरी ऑफ इंडिया
४. श्री. अ. डांगे-प्रिमिटिव्ह कम्यूनिझम टू स्लेव्हरी
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर- हू वेअर् द शुद्राज
६. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
१. प्राच्यवादी इतिहास लेखन-१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासक्रमांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
२. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात.
३. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत व युरोपीय भाषांमधील साधम्यऻचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
४ या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
२. राष्ट्रवादी इतिहास लेखन-१. एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्म जाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हणतात.
२. या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला.
३. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यांनी त्यावर लेखन केले.
४. राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
३. वंचितांचा इतिहास-१. समाजांनी ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात.
२. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
३. इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
४. भारतात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहास लेखनातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
Comments
Post a Comment